Friday 12 April 2013

दुष्काळामध्ये ‘दादाचा’ पाउस

                                                दुष्काळामध्ये ‘दादाचा’ पाउस

सध्या महाराष्ट्राच्या राज्याव्यावास्थेमध्ये कोणत्या घडमुडी चालू आहे याची कल्पना राज्यातल्या संपूर्ण मतदारांना माहित असणे अपेक्षितच आहे.महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर बसणारा दादा जर मतदारांसमोर आज कट्यावरची भाषा वापरून माफी मागतोय तर उद्या संपूर्ण महाराष्ट्राचाच कट्टा झाल्यानंतर ची माफी अपेक्षित ठरेल का? हे एक प्रश्नचिन्हाच आहे.
महाराष्ट्राच्या राज्याव्यवस्थेची ची अवस्था ही लाथ मारून पाया पडण्यासारखी झालीये का? असा मला भासच दादाच्या दादागिरीच्या वक्तव्यानंतर कायमच होत आहे. आधी वाट्टेल ते बोलायचं आणि मग दिलगिरी व्यक्त करायची यामध्ये कोणता अर्थ मतदारांनी घ्यायला पाहिजे?. ज्या व्यक्तीला स्वतःच्या बोलण्यावर ताबा नाही तो राज्याचीव्यवस्था दुर्व्यवस्थेत बदलेल का याची काळजी सामान्यमाणसाकडून साहजिकच आहे. एका सामान्यव्यक्तीकडून राज्याबाद्दल्ची एवढी काळजी कदाचित दादा ला अनपेक्षित असेल कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याकडूनच दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अशा वक्तव्याचा पाऊस पडेल हे सुद्धा आम्हाला अनपेक्षितच होत.एवढंच नव्हेतर दादाच्या वक्तव्याच्या पाऊसाने त्यांच्या काकांना सुद्धा ओलेचिंब केले त्यावर काकाने पुतण्याच्या वतीने पाऊसमध्ये भिजणाऱ्या मंडळीची माफी मागितली. त्यंच्या ह्या काका आणि पुतण्याच्या सारावासाराविमुळे मला “ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” हे गाण आठवलं पण या गाण्यासारखी अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची होईल का? असा प्रश्न माझ्यामनातत भिजत आहे...
                                                                   
                                                                   -शुभम तेलभाते
                                                                                                                          itsshubhtelbhate@gmail.com

No comments:

Post a Comment